50 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न !
स्टेम प्राधिकरण केडीएमसी संकटात आणते का ?
थारवाणी बिल्डरवर नगररचना विभागाची विशेष मेहेरबानी ! बिल्डर लॉबीत सक्रिय असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे उद्योग !
KDMC IAS आयुक्त अभिनव गोयल,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,स्टेम प्राधिकरण चे पदसिद्ध संचालक असलेले ठाणे पालिकेचे आयुक्त,जिल्ह्याचे पालकमंत्री,उपमुख्यमंत्री,स्थानिक खासदार,आमदार या महत्वपूर्ण गंभीर विषयावर व्यक्त होणार नाहीत.
1 मे 1987 साली ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
उल्हास नदी पात्रातून मोहने आंबिवली येथून स्टेम दररोज 300 MLD पाणी उचलून ते पिण्या योग्य करून ठाणे महापालिका,भिवंडी निजामपूर महापालिका,मीरा भाईंदर महापालिका,जिल्हा परिषद ठाणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरवीत आहे. स्टेमची 1850 व्यास मोठ्या जलवाहिन्या 20 मीटर रुंद जागेतून साडे दहा किलोमीटर पर्यंत शुद्धीकरण केंद्र पर्यंत आहेत.
आता स्टेम चे उत्पन्न साधन म्हणून जलवाहिन्या मोकळ्या जागेचा भाडेतत्वावर वापर करण्याचा प्रकार स्टेम कंपनीला
भविष्यात महागात पडणार आहे.1850 व्यास असलेली इतकी मोठी जलवाहिनीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.
बिल्डर लॉबीला फायदा व्हावा म्हणून केडीएमसी नगररचना विभागातील बिल्डर धार्जिणे अधिकाऱ्यांनी आयडियाची कल्पना साकार केली.
विषय काय आहे तो व्हिडिओ लिंक ओपन करून समजून घ्या….