Close Menu
    अधिक वाचा

    लता दिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘ मेरा साया साथ होगा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वा. सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजन

    मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान – थेटभेट प्रवीण दवणे

    Kalyan श्री स्वामी सहजानंद चौक मंडळाचे नवरात्रोत्सवाचे 50वे वर्ष

    KDMC ऑन लाईन लेखी परिक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 14 जिल्ह्यात त्याचे 25 केंद्रात नियोजन

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»उल्हास नदीसाठी खरे उपाय हवेत – फक्त जलपर्णी काढून काही नाही होणार.. सांडपाणी आणि नदीचा नैसर्गिक प्रवाहाचे विभाजन महत्त्वाचे!

    उल्हास नदीसाठी खरे उपाय हवेत – फक्त जलपर्णी काढून काही नाही होणार.. सांडपाणी आणि नदीचा नैसर्गिक प्रवाहाचे विभाजन महत्त्वाचे!

    1 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रोहन घुगे यांनी नदीची पाहणी केली आणि जलपर्णी हटवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने योजना राबवली जाईल, असे सांगितले. मात्र, तज्ज्ञांच्या मते जलपर्णी ही खरी समस्या नसून फक्त प्रदूषणाचा परिणाम आहे.
    जलपर्णी म्हणजे प्रदूषणाचे लक्षण, मूळ समस्या नाही!
    उल्हास नदीसह अनेक नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढते, याचे कारण म्हणजे नदीत मिसळणारे सांडपाणी आणि औद्योगिक कचरा. नदीत मोठ्या प्रमाणावर नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स आल्याने जलपर्णी वाढते. त्यामुळे जलपर्णी काढल्याने समस्या सुटत नाही, कारण प्रदूषित पाणी तसेच राहते.
    CEO साहेब, जलपर्णी काढून प्रश्न सुटणार नाही!
    जर प्रशासनाला खरोखरच नदी वाचवायची असेल, तर केवळ जलपर्णी हटवण्यापेक्षा नदी आणि सांडपाणी वेगळे करण्यावर भर द्यावा.
    उल्हास नदी स्वच्छतेसाठी त्वरित आवश्यक उपाय:
    1.स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Sewage Treatment Plant – STP) सुरू करणे.
    2.गटारांचे आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडण्यावर कठोर बंदी.
    3.कारखान्यांना त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास भाग पाडणे.
    4.नदीकिनारी हरितपट्टा (Green Belt) विकसित करून प्रदूषण रोखणे.
    5.ग्रामपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन जलप्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.
    उल्हास नदी पुनरुज्जीवनासाठी जलपर्णी काढणे हा तात्पुरता उपाय असून ही एक मलाई खाणाऱ्यांची रोजगार हमी योजना म्हणून सामान्य लोक ह्या कृतीकडे पाहतात, पण खरी गरज आहे ती गटार आणि नदी वेगळे करण्याची! ठाणे जिल्हा परिषदेने त्वरित यावर उपाययोजना करावी, अन्यथा उल्हास नदी भविष्यात अजूनच प्रदूषित होईल.
    उल्हास नदी बचाव कृती समिती ….
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    लता दिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘ मेरा साया साथ होगा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वा. सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजन

    मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान – थेटभेट प्रवीण दवणे

    Kalyan श्री स्वामी सहजानंद चौक मंडळाचे नवरात्रोत्सवाचे 50वे वर्ष

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    लता दिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘ मेरा साया साथ होगा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वा. सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजन

    लतादिदींच्या अजरामर गाण्यांची मैफल अनुभवता येणार मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गानसम्राज्ञी…

    मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान – थेटभेट प्रवीण दवणे

    Kalyan श्री स्वामी सहजानंद चौक मंडळाचे नवरात्रोत्सवाचे 50वे वर्ष

    KDMC ऑन लाईन लेखी परिक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 14 जिल्ह्यात त्याचे 25 केंद्रात नियोजन

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2025 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.