आणीबाणी काळात नागरिकांनी सजग कसे रहावे…. कल्याणात रिटायर्ड कॅप्टन सुनील कांबळे यांनी एका डिजास्टर कार्यक्रमात लोकांना सध्याच्या काळात अँड्रॉइट मोबाईल जमान्यात सुरक्षित कसे राहायचं त्याचे धडे दिले. शत्रू देशात तुमच्या प्रत्येक सोशल कृतीकडे माहितीकडे बारीक लक्ष असते. त्यामुळे तरुण पिढीने मोबाईल वापरताना स्वतःचे सेल्फी फोटो काढताना सार्वजनिक ठिकाणांची माहिती एक्सपोज करू नये असे आवाहन केलं आहे. कल्याण प्रांत अधिकारी विश्वास गुजर,कल्याण तहसीलदार शेजुळ,पालिका उपआयुक्त संजय जाधव,यांच्या प्रमुख उपस्थित हा महत्वपूर्ण कार्यक्रम आज आचार्य अत्रे नाट्यगृहात संपन्न झाला.